🙏संस्कार कथा🙏_
➖➖➖➖➖➖➖➖➖
गोपू आजोबांचा लाडका होता. स्वभावाने तो खोडकर पण, तितकाच गुणवान होता. अभ्यास तसेच खेळांमध्येही तो सर्वाच्या आघाडीवर असायचा. पण, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक. त्याचे वागणे जरा विचित्र होत चालले होते. तो वाईट मित्रांच्या संगतीत राहू लागला. कधी न कुणाविरुद्ध अपशब्द काढणारा तो गोपू वर्गात दुस-यांच्या टिंगल टवाळक्या करू लागला. विनाकारण कुणाच्याही खोडय़ा काढण्यात त्याला खूप मजा येत असे.
अभ्यासात होत असलेलं दुर्लक्ष आणि त्याच्या या बदललेल्या अनपेक्षित वर्तणुकीमुळे त्याचे आई-वडील अधिकच चिंतीत होत होते. त्यांनी गोपूला घरी येऊन आपल्यापरीने खूप समजाविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी गोपूच्या आजोबांना एक युक्ती सुचली. त्यांनी तडक बाजारातून काही आंबे, एक टोपली आणि एक सडका आंबा विकत घरी आणला आणि गोपूला म्हणाले, ‘‘गोप्या, या आंब्यांना टोपलीत व्यवस्थित भर. आणि त्यात हा सडलेला आंबाही ठेव. परवा ते आपल्याला खायचे आहेत.’’
आजोबांनी सांगितल्याप्रमाणे गोपूने अगदी तसेच केले. तिस-या दिवशी आजोबा गोपूला म्हणाले, ‘‘गोपू, चल ती आंब्यांनी भरलेली टोपली घेऊन ये.’’ त्यांच्या या वक्तव्यावर गोपू ती टोपली लगेच दिवाणखान्यात घेऊन आला. त्याने ती टोपली उघडून बघितली आणि आश्चर्याने आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा, हे काय? आतमधले सगळे आंबे त्या एका सडक्या आंब्यामुळे खराब झाले आहेत.’’
आजोबा लगेच उत्तरले, ‘‘अगदी बरोबर गोप्या, बघितलंस हा संगतीचा वाईट परिणाम. एका सडक्या आंब्याच्या सान्निध्यामुळे इतरही आंबे नासके निघाले. आपल्या जीवनातही आपल्यासोबत नेमकं असंच होत असतं. वाईट प्रवृत्तींचा जर आपल्याला सहवास लाभला तर आपणही नकळतपणे त्या प्रवृत्तींना बळी पडतो. आपण खोटेपणाने वागायला लागतो. या सवयींमुळे आपली माणसं आपल्यापासून दुरावतात. शेवटी तू ही तुझ्या त्या वाईट मित्रांच्या आहारी गेलास आणि पूर्वीचा सर्वाना हवाहवासा तुझा स्वभाव गमावून बसलास.’’
आजोबांचे हे बोलणे ऐकून गोपू निरुत्तर झाला आणि त्याने त्याच्या त्या चुकीची आजोबांकडे मोठय़ा मनाने क्षमा मागितली आणि यापुढे पूर्वीसारखा प्रामाणिकपणे वागेन असे आश्वासन दिले.
वाईट संगतीचा परिणाम हा शेवटी वाईटच असतो. वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहणेच चांगले असते !
*➖➖➖➖➖➖➖➖
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
➖➖➖➖➖➖➖➖➖
गोपू आजोबांचा लाडका होता. स्वभावाने तो खोडकर पण, तितकाच गुणवान होता. अभ्यास तसेच खेळांमध्येही तो सर्वाच्या आघाडीवर असायचा. पण, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक. त्याचे वागणे जरा विचित्र होत चालले होते. तो वाईट मित्रांच्या संगतीत राहू लागला. कधी न कुणाविरुद्ध अपशब्द काढणारा तो गोपू वर्गात दुस-यांच्या टिंगल टवाळक्या करू लागला. विनाकारण कुणाच्याही खोडय़ा काढण्यात त्याला खूप मजा येत असे.
अभ्यासात होत असलेलं दुर्लक्ष आणि त्याच्या या बदललेल्या अनपेक्षित वर्तणुकीमुळे त्याचे आई-वडील अधिकच चिंतीत होत होते. त्यांनी गोपूला घरी येऊन आपल्यापरीने खूप समजाविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी गोपूच्या आजोबांना एक युक्ती सुचली. त्यांनी तडक बाजारातून काही आंबे, एक टोपली आणि एक सडका आंबा विकत घरी आणला आणि गोपूला म्हणाले, ‘‘गोप्या, या आंब्यांना टोपलीत व्यवस्थित भर. आणि त्यात हा सडलेला आंबाही ठेव. परवा ते आपल्याला खायचे आहेत.’’
आजोबांनी सांगितल्याप्रमाणे गोपूने अगदी तसेच केले. तिस-या दिवशी आजोबा गोपूला म्हणाले, ‘‘गोपू, चल ती आंब्यांनी भरलेली टोपली घेऊन ये.’’ त्यांच्या या वक्तव्यावर गोपू ती टोपली लगेच दिवाणखान्यात घेऊन आला. त्याने ती टोपली उघडून बघितली आणि आश्चर्याने आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा, हे काय? आतमधले सगळे आंबे त्या एका सडक्या आंब्यामुळे खराब झाले आहेत.’’
आजोबा लगेच उत्तरले, ‘‘अगदी बरोबर गोप्या, बघितलंस हा संगतीचा वाईट परिणाम. एका सडक्या आंब्याच्या सान्निध्यामुळे इतरही आंबे नासके निघाले. आपल्या जीवनातही आपल्यासोबत नेमकं असंच होत असतं. वाईट प्रवृत्तींचा जर आपल्याला सहवास लाभला तर आपणही नकळतपणे त्या प्रवृत्तींना बळी पडतो. आपण खोटेपणाने वागायला लागतो. या सवयींमुळे आपली माणसं आपल्यापासून दुरावतात. शेवटी तू ही तुझ्या त्या वाईट मित्रांच्या आहारी गेलास आणि पूर्वीचा सर्वाना हवाहवासा तुझा स्वभाव गमावून बसलास.’’
आजोबांचे हे बोलणे ऐकून गोपू निरुत्तर झाला आणि त्याने त्याच्या त्या चुकीची आजोबांकडे मोठय़ा मनाने क्षमा मागितली आणि यापुढे पूर्वीसारखा प्रामाणिकपणे वागेन असे आश्वासन दिले.
वाईट संगतीचा परिणाम हा शेवटी वाईटच असतो. वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींपासून नेहमी दूर राहणेच चांगले असते !
*➖➖➖➖➖➖➖➖
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
No comments:
Post a Comment